Published On : Fri, May 4th, 2018

महाराष्ट्राच्या प्रगतीत वित्तीय संस्थांचा मोलाचा वाटा – मुख्यमंत्री

जालना: महाराष्ट्राच्या प्रगतीत वित्तीय संस्थांचा मोलाचा वाटा असून नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वित्तीय संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. देवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर समेत स्थानीय नेते व अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

महाराष्ट्रात सहकार क्षेत्र तळागाळापर्यंत पोहोचल्यामुळे वित्तीय संस्थांचे जाळे तयार झाले आहे. राज्याचा सर्वसमावेशक विकास हा वित्तीय संस्थांच्या माध्यमातून होत आहे. जनधन योजनेच्या माध्यमातून देशातील 32 कोटी लोकांना थेट लाभ मिळाला असून नागरिकांच्या खात्यावर विविध योजना आणि अनुदानाची रक्कम थेट जमा होत आहे. हे वित्तीय संस्थांच्या सहभागामुळेच शक्य झाले आहे. तसेच वित्तीय संस्थांकडून नागरिकांना चांगली वागणूक मिळत असल्याने वित्तीय व्यवहारात पारदर्शकता आणि जनतेमध्ये वित्तीय संस्थांबाबत विश्वासार्हता निर्माण झाली आहे. विश्वस्त व्यवस्थेतून जे विधायक काम होते, ते राज्याला प्रगतीच्या दिशेने नेण्यास निश्चितच मदत करीत आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement