नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे यांनी पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालांवर तीव्र प्रतिक्रिया देत ममता सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी हा निकाल ‘सुशासनाचा विजय’ असल्याचे सांगत बंगालमध्ये दीर्घकाळ चाललेल्या कथित दडपशाहीला अखेर पूर्णविराम मिळाल्याचा दावा केला.
बावनकुळे म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात हिंसा, दडपशाही आणि राजकीय सूडाचे वातावरण होते. भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांवर अत्याचार झाले, मात्र संघ परिवार, बूथ व्यवस्थापन आणि वरिष्ठ नेत्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर जनतेने बदलाचा कौल दिला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेवर विश्वास ठेवत बंगालच्या जनतेने विकासाला मत दिल्याचेही नमूद केले.
महाराष्ट्रातील राजकारणावर बोलताना बावनकुळे यांनी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी विरोधकांना बंगालच्या निकालातून धडा घेण्याचा सल्ला देत, “जनता विकासाच्या बाजूने ठाम उभी आहे,” असे स्पष्ट केले. तसेच 2047 पर्यंत विरोधकांना सत्तेपासून दूर राहावे लागेल, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, नसरापूर येथील घटनेबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याच मुद्द्यावर नवनाथ बन यांनी विरोधकांवर टीका करत, विशेषतः संजय राऊत यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “विरोधक जिंकले तर ‘लोकशाहीचा विजय’ म्हणतात, पण भाजप जिंकली की ‘लोकशाही धोक्यात’ असल्याचे सांगतात,” असा आरोप त्यांनी केला.
बंगालच्या जनतेने 15 वर्षांच्या सत्तेविरुद्ध रोष व्यक्त करत हिंसाचार आणि गुंडगिरीला नाकारले असून, महाराष्ट्रातही जनतेने महायुतीला पाठिंबा देत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला नाकारल्याचा दावा त्यांनी केला.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
5 मिनट की चूक... 4.50 लाख पर चोरों का झपट्टा! #nagpurnews #crime...
प्रेम का झांसा, ब्लैकमेलिंग और वसूली का खेल! #nagpurnews #crime #latestnews #maharashtranews
खाकी का रौब, ठगी का खेल! फर्जी पुलिस का किया पर्दाफाश #nagpurnews...
मध्य प्रदेश से नागपुर तक गांजे की डिलीवरी! #nagpurnews #crime #md #taskar...
फर्जी दस्तावेजों के दम पर 15 लाख की ठगी.. #nagpurnews #crime #goldloan...









