Published On : Tue, Aug 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

वैभव खेडेकरसह ४ नेत्यांची मनसेतून हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चा भडकल्या

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) मोठा संघटनात्मक बदल झाला आहे. पक्षाचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांच्यासह अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे, सुबोध जाधव यांना मनसेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

या निर्णयामागील कारण म्हणजे खेडेकर यांच्यावर भाजप किंवा शिवसेना (शिंदे गट) कडे जाण्याच्या चर्चांना चालना देणे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पक्षविरोधी हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. अखेर पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी हस्तक्षेप करून ही कारवाई केली.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वैभव खेडेकर हे राज ठाकरेंच्या मनसे स्थापनेपासून कोकणात पक्षासाठी महत्त्वाचे कार्य करणारे नेते आहेत. दापोली व खेड परिसरात त्यांचा मजबूत जनसंपर्क असून तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता विशेष आहे.

गेल्या काही दिवसांत खेडेकरांना भाजपकडून खुले आमंत्रण देण्यात आले होते. दापोलीत पार पडलेल्या महायुतीच्या कार्यक्रमात ते व्यासपीठावर होते आणि महायुतीने त्यांना पक्षात सामील होण्याचे संकेत दिले होते.

मनसेतून पत्र पाठवून ही हकालपट्टी करण्यात आली असून, पत्रात म्हटले आहे की पक्षाचे नियम मोडणे आणि पक्षविरोधी कार्य करणाऱ्या नेत्यांना राज ठाकरेंच्या आदेशानुसार पक्षातून काढले गेले आहे.

वैभव खेडेकर यांनी २०१४ मध्ये दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. ते यापूर्वी खेड नगरपरिषदेत नगराध्यक्ष राहिले आहेत आणि कोकणातील मनसेच्या संघटनात्मक उभारणीत त्यांचा मोठा वाटा आहे.

मनसेकडून हकालपट्टी झाल्याने पक्षाला कोकणातील संघटनात्मक आणि नेतृत्व स्तरावर मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement