Published On : Mon, Nov 27th, 2023
By Nagpur Today Nagpur News

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ; देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दिले मदतीचे आश्वासन

नागपूर : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. विविध भागात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पीक हानी झाली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवण्यास सांगितले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

विदर्भासह राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे विदर्भात कापूस आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान पाहता फडणवीस यांनी त्यांना आश्वासन दिले आहे.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपुरात दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांना या संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले की, आम्ही सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना पीक हानी बाबत अहवाल पाठविण्यास सांगितले आहे. शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असे फडणवीस म्हणाले आहे.

Advertisement
Advertisement