Published On : Mon, Jun 1st, 2020

वादळी वारा-पावसामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करावे : बावनकुळे

Advertisement

नागपूर : रविवार दिनांक 31 मे रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे जे नुकसान झाले आहे, त्या नुकसानीचे त्वरित सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी अशी मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

या पावसामुळे भाजीपाल्याचे व अन्य पिकांचे शेतकर्‍याचे नुकसान झाले आहे. तसेच ग्रामीण भागातील गरीबांच्या घरांचेही नुकसान झाले आहे.

Gold Rate
17 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,42,600/-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,83,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घरावरील टीन उडून गेले. कामठी, मौदा, नागपूर ग्रामीण व अन्य जिल्ह्यातही या वादळी पावसामुळे लोकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण प्रशासनाने त्वरित करून त्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement