Published On : Thu, Nov 26th, 2020

दंड वसूल करुन आता बेजबाबदार नागरिकांना मनपा देईल मास्क

Advertisement

आतापर्यंत २१४७९ व्यक्तिं विरुध्द कारवाई

नागपूर : मास्क शिवाय फिरणा-या बेजाबदार नागरिकांना नागपूर महानगरपालिका व्दारा ५०० रुपये दंड वसूल करुन मास्क देण्यात येत आहे. मनपा तर्फे या नागरिकांना निवेदन करण्यात येत आहे कि बाहेर फिरताना मास्क घाला आणि स्वत:चा व दूस-यांचा जीव धोक्यात घालू नका.

मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी नागरिकांच्या जीवन पध्दतीमध्ये सुधारणा करण्यासाठी दंड केल्यानंतर मास्क देण्याचे आदेश दिले आहे. या माध्यमातुन नागरिकांमध्ये मास्क लावण्याची वृत्ती निर्माण होईल. अति.आयुक्त श्री. राम जोशी यांनी सांगितले की मनपा तर्फे ही “गांधी गिरी” नागरिकांना चांगली सवय लावण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. कोव्हीड ला नियंत्रणात ठेवण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे आणि हात धुणे आवश्यक आहे. उपद्रव शोध पथकाचे जवान नागरिकांकडून दंड वसूल करुन मास्क देतील.

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी (२६ नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १५९ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ७९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही दिवसात शोध पथकांनी २१४७९ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ९०,९८,५००/- चा दंड वसूल केला आहे.

गुरुवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २५, धरमपेठ झोन अंतर्गत २१, हनुमाननगर झोन अंतर्गत २५, धंतोली झोन अंतर्गत ८, नेहरुनगर झोन अंतर्गत १२, गांधीबाग झोन अंतर्गत ९, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ८, लकडगंज झोन अंतर्गत ७, आशीनगर झोन अंतर्गत १३, मंगळवारी झोन अंतर्गत २८ आणि मनपा मुख्यालयातील ३ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत १६००९ बेजबाबदार नागरिकांकडून रु ८० लक्ष ४ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.

नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत चालली आहे यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करीत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क न वापणा-या नागारिकांना वचक बसावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने ही दंडाची रक्कम १५ सप्टेंबर पासून ५०० रुपये करण्यात आली आहे. सुजाण व जबाबदार नागरिकांनी आता मास्क लावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन म.न.पा.तर्फे करण्यात आले आहे.