Published On : Mon, Mar 2nd, 2020

आंदोलनातील निर्दोशांचा विचार केल्याबद्धल गृह मंत्री साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले

Advertisement

कन्हान : मराठासह शेतकरी आंदोलनातील व भीमा कोरेगाव आंदोलनातील निर्दोष कार्यकर्ता व नागरिकांचे महाराष्ट्र सरकारनी केसेस मागे घेण्याची भूमिका घेतल्या बद्धल महाराष्ट्र राज्याचे ग्रह मंत्री नामदार श्री अनिलबाबू देशमुख यांचे रविभवन येथील कॉटेज नं ११ मध्ये पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्रात सरकार व गृह मंत्री साहेबांचे आभार व्यक्त करण्यात आले प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर, राष्ट्रवादीचे नेते व री. पा भीम शक्तीचे अध्यक्ष चंद्रशेखर भीमटे, आंबेडकर चळवडीचे नेते कैलास बोरकर, समाजसेवक रणजित सफेलकर, कैलास राऊत, रमेश गोडघाटे, विवेक पाटील, रोहित मानवटकर, योगेश ढावले, उमेश बागडे, सहित मोठ्या संखेत पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.