Published On : Mon, Feb 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026: विदर्भात स्टील कॉरिडॉर उभारणार, राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे विधान

Advertisement

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात सोमवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणाने झाली. आपल्या भाषणात त्यांनी आगामी वर्षासाठी राज्याच्या विकासाचा व्यापक आराखडा मांडला. पायाभूत सुविधा, उद्योग, पर्यावरण आणि शेती या क्षेत्रांमध्ये संतुलित विकासावर सरकारचा भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विदर्भात स्टील कॉरिडॉरची मोठी घोषणा-
राज्यपालांनी विदर्भाच्या औद्योगिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत स्टील कॉरिडॉर उभारण्याची घोषणा केली. तसेच Gadchiroli district जिल्ह्याला ‘स्टील सिटी’ म्हणून विकसित करण्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले. या प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येऊन स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Gold Rate
Feb 24rd, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 160,600 /-
Gold 22 KT ₹ 1,49,400 /-
Silver/Kg ₹ 2,66,300 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

परकीय गुंतवणुकीत राज्य अव्वल-
2024-25 या आर्थिक वर्षात राज्यात 16 लाख कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक (FDI) झाली असून देशातील एकूण गुंतवणुकीपैकी 39 टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे, असे राज्यपालांनी नमूद केले. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) राज्याचा 13 ते 13.5 टक्के हिस्सा असल्याचेही त्यांनी सांगितले. दावोस येथे झालेल्या करारांमधून सुमारे 30 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात येणार असून विविध क्षेत्रांत नवीन उद्योग उभारले जाणार आहेत.

147 रस्ते सुधारणा योजना मंजूर-
राज्यातील 147 रस्ते सुधारणा योजनांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती देताना त्यांनी पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला. तसेच Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg (समृद्धी महामार्ग) विस्ताराचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर केले. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण योजना राबविण्यात येणार आहे.

‘हरित महाराष्ट्र’ अभियान-
2025 पासून ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ जनअभियान सुरू करण्यात आले असून 10 कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 9 कोटी 88 लाख झाडे लावण्यात आल्याची माहिती राज्यपालांनी दिली. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर-
शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर सरकारचा भर असेल, असे त्यांनी सांगितले. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शांनुसार राज्याची वाटचाल सुरू असल्याचे अधोरेखित करत सर्वसमावेशक आणि संतुलित विकास साधण्याचा निर्धार राज्यपालांनी व्यक्त केला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement