Published On : Tue, May 8th, 2018

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी सरकारचा संबंध नाही, भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

संभाजीनगर: शेतकरी आत्महत्यांचा सरकारशी कोणताही संबंध नाही. नोटाबंदी, जीएसटीमुळे शेतकरी आत्महत्या करत नसून त्याला वैयक्तिक कारणे असल्याचे वादग्रस्त वक्तव्य संभाजीनगरचे भाजप आमदार अतुल सावे यांनी केले . आमदार सावे यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे .

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांना अत्महत्या सारखे पाऊल उचलावे लागते . सातत्याने पडणारा दुष्काळ, गारपीट, शेतमालाला मिळणारा मातीमोल भाव यामुळे शेतकरी संकटात येतो . या समस्यांवर तोडगा न काढता भाजपचे सावे यांनी पत्रकार परिषदेत शेतकरी आत्महत्यांची टिंगल उडवली .
कोणाच्या डोक्यावर वैयक्तिक कर्ज असते, कुणाच्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न असतो त्यातून आत्महत्या होतात. या आत्महत्यांचा सरकारशी काडीमात्र संबंध नसल्याचा कांगावा त्यांनी केला.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नोटाबंदी, जीएसटीमुळे शेतकरी आत्महत्या करत नाहीत, त्याच्या आत्महत्येचे कारण वैयक्तिक आणि निराळेच असते असे विधानही त्यांनी केले .

Advertisement
Advertisement