Published On : Mon, Jan 13th, 2025
By Nagpur Today Nagpur News

भाजपने केली विश्वासघाती राजकारणाची सुरुवात;अमित शहांच्या शरद पवारांवरील विधानावर देशमुख यांचे प्रत्युत्तर

नागपूर: शिर्डी येथे सुरू झालेल्या भाजप अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) प्रमुख शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

मित शहा म्हणाले की, शरद पवार यांनी १९७८ पासून सुरू केलेले विश्वासघाती राजकारण जनतेने २० फूट जमिनीखाली गाडले आहे. ठाकरे आणि पवार यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेने जागा दाखविली आहे.

Gold Rate
May 05- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,48,800 /-
Gold 22 KT ₹ 1,38,400 /-
Silver/Kg ₹ 2,47,500/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहांच्या या विधानावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.महाराष्ट्रात फसवणुकीचे आणि तोडाफोडीचे राजकारण भाजपने सुरू केले आहे.“महाराष्ट्रात भाजपने प्रथम शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला.

त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारचे विश्वासघाती राजकारण सुरु केले. तसेच भाजप नेते पवार साहेबांचे राजकारण संपवण्याची भाषा करतात त्यांनी हे समजून घ्यावे की पवार साहेबांचे राजकारण कोणीही संपवू शकत नाही.असेही देशमुख म्हणाले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement