Published On : Fri, Dec 5th, 2025
By Nagpur Today Nagpur News

देशासह महाराष्ट्रावर मोठं संकट;पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे!

Advertisement

मुंबई – देशभरातील हवामानात मोठे चढउतार सुरू असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. कधी गारठा, तर कधी अचानक पडणारा अवकाळी पाऊस यामुळे हवामान पूर्णपणे अस्थिर झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात मोठा बदल घडला असून त्याचा थेट प्रभाव अनेक राज्यांवर जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील अठ्ठेचाळीस तास अत्यंत धोकादायक ठरू शकतात, असा महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे.

महाराष्ट्रातही परिस्थिती अनिश्चितच राहिली आहे. मागील काही दिवसांपासून वाढणारा गारठा आणि त्यातच पुन्हा पडणारा पाऊस नागरिकांना गोंधळात टाकणारा ठरत आहे. मॉन्सून मागे सरूनही हवामान अचानक पावसाळ्यासारखे वागू लागल्याने अनेक जिल्ह्यांत थंडी आणि पावसाचा संगम स्पष्ट जाणवत आहे. यंदा पावसाने अनेक ठिकाणी विक्रमी नोंदी केल्याने वातावरण अधिकच अस्थिर बनल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Gold Rate
05 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,28,300 /-
Gold 22 KT ₹ 1,19,300 /-
Silver/Kg ₹ 1,77,600/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

केरळमध्ये पावसाचा जोर कमी होण्याचे नाव घेत नाही. हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरण्याची, काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटही कायम असल्याने स्थानिक प्रशासन सतर्कतेच्या मोडमध्ये आहे.

आंध्र प्रदेशातील किनारी भागांनाही पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने येथे हेवी रेन अलर्ट दिला असून वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह खराब हवामानाचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरातील अस्थिर स्थितीचा या प्रदेशांवर मोठा प्रभाव जाणवेल, असे संकेत मिळत आहेत.

एकूणच, देशासह महाराष्ट्रासाठी पुढील अठ्ठेचाळीस तास अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. हवामानातील अस्थिरता लक्षात घेता, नागरिकांनी सावध राहणे, अनावश्यक प्रवास टाळणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक ठरणार आहे.

Advertisement
Advertisement