Published On : Mon, Apr 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

आशाताईंच्या स्वप्नाला मिळणार आकार; राज्य सरकारचा मोठा निर्णय जाहीर

Advertisement

मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर राज्य सरकारने त्यांच्या संकल्पनेतील उपक्रम साकार करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर चित्रपट, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Gold Rate
Apr 132026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,51,300 /-
Gold 22 KT ₹ 1,40,700 /-
Silver/Kg ₹ 2,40,600/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशाताईंच्या इच्छेनुसार संगीत क्षेत्राशी संबंधित संस्था उभारण्यासाठी शासन सकारात्मक पावले उचलेल, अशी घोषणा केली. मंत्रिमंडळ बैठकीत आशाताईंना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यांच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आशाताईंच्या कार्याचा गौरव करत शोकप्रस्ताव मांडला. आशाताईंनी संगीत क्षेत्रासाठी एक संस्था उभारण्याची कल्पना मांडली होती. आता त्यांच्या स्मरणार्थ ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होणार आहेत.

आपल्या कारकिर्दीत आशाताईंनी हजारो गाणी गाऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. विविध भाषांमध्ये त्यांनी गायलेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. २००० साली त्यांना देशातील सर्वोच्च चित्रपट सन्मान ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ही प्रदान करण्यात आला होता.

आशाताईंचा मधुर आवाज आणि त्यांनी दिलेली गाणी हीच त्यांची खरी ओळख ठरली असून, त्या कायम आपल्या आठवणीत जिवंत राहतील, अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement