कामठी – गौतम नगर छावणी परिसरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी नगरसेविका संध्या रायबोले यांनी दोन हँड पंप तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्फत खनिकर्म विभाग द्वारा मंजूर केले होते.
प्रभाग १५ तील गौतम नगर छावणी तथा राणी तलाव परिसरात २ हँड पंप निर्माण करण्यात येतील अशी माहिती नगरसेविका संध्या रायबोले यांनी दिली
यावेळी नरेशचंद्र कलसे,किशोर पांडे, मनोज मेथीया, गेंदलाल कलसे,राकेश मधुमटके,रमेश सकतेल,बबली काटरपवार,शिव शर्मा,भारत मेथीया,विक्की बोंबले,आदित्य जगणीत,मनिष डोंगरे,सचिन चांदोरकर,उज्वल रायबोले आदी उपस्थित होते.