Published On : Mon, Jun 9th, 2025
By Nagpur Today Nagpur News

राज्यात १४ जूनपर्यंत उन्हाची तीव्रता कायम; शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाची विशेष सूचना

Advertisement

मुंबई : मागील दोन आठवड्यांपासून राज्यात मान्सून विलंबाने येत असून, १५ जूनपर्यंत त्यात आणखी उशीर होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. या विलंबामुळे राज्यातील बहुतांश भागांत १४ जूनपर्यंत तापमानात झपाट्याने वाढ होणार असून, नागरिकांना चटक उन्हाचा त्रास सहन करावा लागणार आहे.

विदर्भात तापमानाने तोडले विक्रम –
विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या भागांत तापमान ४० अंशांच्या वर जाण्याची शक्यता आहे. विशेषतः पूर्व विदर्भात तापमान ४५ अंशांपर्यंत जाऊ शकते. नागपूरचे तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून, ते सरासरी तापमानाच्या तुलनेत १.३ अंशांनी अधिक आहे. त्यामुळे नागपूर विदर्भातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा ठरला आहे.

Gold Rate
06 June 2025
Gold 24 KT 98,000/-
Gold 22 KT 91,100/-
Silver/Kg 1,06,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विदर्भातील प्रमुख शहरांचे तापमान –

चंद्रपूर – ४२.०°C
गोंदिया – ४२.१°C
अमरावती – ४१.६°C
अकोला – ४१.२°C
वर्धा – ४१.५°C
यवतमाळ – ४०.६°C
गडचिरोली – ३९.८°C
भंडारा – ४१.६°C
बुलढाणा – ३६.४°C
वाशिम – ३६.८°C
मराठवाडा झळाळतंय-
या भागांतील अनेक जिल्ह्यांमध्येही तापमान ४० अंशांच्या आसपास राहणार आहे. पावसाचा सार्वत्रिक संपर्क नसल्यामुळे उन्हाचे प्रमाण अधिक जाणवणार आहे.

पावसाचा अंदाज आणि हवामान बदल –
राज्यात १४ जूनपर्यंत सार्वत्रिक किंवा मान्सून पावसाची शक्यता नाही. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि वीजांसह हलकासा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, विशेषतः दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आठवड्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात पाऊस होऊ शकतो.

शेतकऱ्यांना हवामान विभागाचा सल्ला –

हवामान विभागाने शुष्क जमीन असलेल्या शेतकऱ्यांना बियाणे पेरणीसाठी घाई करू नका, असा स्पष्ट सल्ला दिला आहे. मान्सूनसदृश स्थिती निर्माण होईपर्यंत वाट पाहावी, अन्यथा बियाणे आणि पाण्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

सावधगिरी बाळगा – प्रशासनाचा इशारा –
प्रखर उन्हामुळे नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळेत बाहेर न पडणे, पुरेसा पाणीपडदा घालणे, थंड पेये आणि पाणी भरपूर प्रमाणात घेणे यासारखी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

मान्सून अजून प्रतीक्षेत-
राज्यातील शेतकरी आणि नागरिक यांना अद्याप मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. १५ जूननंतर परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement