Advertisement
कामठी : -कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन सुरू केल्या चा सर्वाधिक फटका रोज कमावून रोज खाणाऱ्या कामगारांना बसला आहे रोजगार बंद झाल्याने गोरगरीब मजुरांची उपासमार होत आहे
याबाबत येथील नगरसेविका संध्या रायबोले यांनी आमदार टेकचंद सावरकर यांना माहिती दिली असता आ सावरकर यांनी जीवनावश्यक वस्तूंची 200 फूड पैकेट वितरणा साठी पाठविले नगरसेविका संध्या रायबोले यांनी आंनद नगर,रामगढ,रमानगर,शिव नगर,विकतुबाबा नगर भागातील अत्यत गरजू मजूर कुटूंबियांना घरपोच त्याचे वितरण केले
यावेळी भाजपा शहराध्यक्ष संजय कनोजिया, सुनील खनवानी, अमोल कुकडे तसेच बादल कठाने,अरविंद चवडे, रुपेश भुतांगे,विरेंद्र राऊत,कमल क्षत्रिय, गणेश पुरी,अभिषेक गणवीर,शशीकला मैद, सुनीता कटकवार, छाया कोल्हे,आकांशी राव यांनी सहकार्य केले
संदीप कांबळे
Advertisement