Published On : Mon, Mar 23rd, 2020

राज्यात कर्फ्यू लागू, रस्त्यावर फिरणं बंद

Advertisement

उद्धव ठाकरेंनी घेतला कठोर निर्णय

जमावबंदीनंतरही राज्यातील रस्त्यांवर गर्दी सुरू होती. यामुळे राज्य सरकारने कठोर निर्णय घेत संचारबंदीची घोषणा केली आहे. त्यामुळे अनावश्यपणे कोणालाही आता रस्त्यावर फिरता येणार नाही.

राज्यात नाईलाज म्हणून संचारबंदी लागू करत आहोत. महाराष्ट्राच्या सीमा बंद करण्याचा निर्णय काल घेतला. आता जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्याचा

घेण्यात आला आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहतूक बंद करण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांचं राज्याला संबोधन, जाणून घ्या ठळक मुद्दे:
कोरोना व्हायरसच्या धोकादायक वळणावर आलोय

कोरोनाच्या रोखण्याची हीच वेळ आहे

सरकार आपल्यासाठी काम करतंय त्याबद्दल लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

टाळ्या आणि थाळी वाजवणं म्हणजे व्हायरस पळवून लावणं नाही

तर doctor जवान, पोलीस याना अभिवादन करण्यासाठी होतं

पुढच्या टप्प्यातील काही दिवस महत्वाचे आहे

आता आंतरदेशीय वाहतूक बंद करावि अशी pm कडे पत्रातून मागणी

जीवनावश्यक वस्तूची वाहतूक सुरू, पशुखाद्य दुकाने सुरू

दवाखाने सुरू राहतील

घाबरण्याचे कोणतेही कारण नाही