Published On : Mon, Jan 20th, 2025
By Nagpur Today Nagpur News

मुख्यमंत्री तीर्थ क्षेत्र दर्शन योजना फक्त निवडणुकीसाठी होती का? महायुती सरकार स्थापन होऊनही योजना बंदच !

Advertisement

मुंबई : जनतेला देव दर्शन घडविण्याच्या हेतूने महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी तीर्थ क्षेत्र दर्शन योजनेची घोषणा केली. मात्र आचारसंहिता संपून आता पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले. परंतु अद्यापही या योजनेला सुरुवात झाली नाही. त्यामुळे या योजनेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

निवडणुकीपूर्वी राज्यातील ६५०० ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आणि तीर्थयात्रेला भेट दिली. राज्यात नवीन सरकार स्थापन होऊनही, ही योजना अद्याप पुन्हा सुरू झालेली नाही. नवीन अर्ज स्वीकारले जात नाहीत. त्यानंतर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत की, ही योजना फक्त निवडणुकीसाठी होती का?

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्यातील सत्ताधारी महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. यानंतर, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आणि लाडकी बहीण योजनेसह इतर अनेक योजनांची घोषणा केली. या योजनांचे फायदेही उपलब्ध होऊ लागले. तथापि, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेसाठी नवीन अर्ज थांबविण्यात आले.

आचारसंहिता संपल्यानंतरही अर्ज स्वीकारण्यास अद्याप सुरुवात झालेली नाही.हे पाहता तीर्थ क्षेत्र दर्शन योजना महायुतीकडून जनतेला निवडणुकीसाठी देण्यात आलेले प्रलोभन तर नाही ना ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.