Published On : Sat, Mar 30th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटणार; मुख्यमंत्री शिंदे-फडणवीस यांच्यात मध्यरात्री ‘वर्षा’वर चर्चा

Advertisement

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अद्यापही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे काही उमेदवार जाहीर केले असले तरी अद्याप अनेक जागांवरून मतभेद सुरु आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मध्यरात्री चर्चा झाली.

त्यामुळे तिन्ही पक्षात जागांचा तिढा सुटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Gold Rate
17 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,42,600/-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,83,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मध्यरात्री वर्षा बंगल्यावर अडीच तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

यावेळी उदय सामंत आणि शंभूराज देसाई हेही उपस्थित असल्याचे वृत्त आहे. महायुतीत अद्याप काही मतदारसंघाबाबत जागावाटपाचा तिढा कायम असल्याचे सांगितले जात आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर, छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. या जागांवरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या जागेवर शिंदे गट आग्रही असून, ही जागा शिवसेनेला मिळाल्यास मोठ्या ताकदीने जिंकू, असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.

दुसरीकडे, पालघरमध्ये राजेंद्र गावित भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपा दोन्ही पक्ष आग्रही असल्याने ही जागा नेमकी कुणाला मिळणार हे पाहावे लागले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement