नागपूर : राज्यात मतचोरीच्या आरोपांवरून आता शिवसेना (उभयपक्ष) प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आमनेसामने आले आहेत. महाविकास आघाडीने १ नोव्हेंबर रोजी मुंबईत मतचोरीविरोधी आंदोलन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आणि दुहेरी मतदारांची नावे जाहीर करत “मतचोरीमागे सत्ताधारी भाजपचा हात आहे” असा आरोप केला.
त्यावर प्रत्युत्तर देताना राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर तीव्र टीका केली. त्यांनी विचारलं,
“उद्धव ठाकरे यांना दुहेरी मतदार फक्त हिंदूच का दिसतात? कामठी-मालेगाव मतदारसंघात इतर धर्मीय लोक दिसत नाहीत का? महाराष्ट्राचा पप्पू कोण आहे, हे जनता ओळखते.”
बावनकुळे पुढे म्हणाले, “भाजपला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं म्हणून उद्धव ठाकरे आता मतचोरीचा आरोप करत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले .मग हे खासदार मतचोरी करूनच आले का? जर मतचोरी झाली असती, तर निवडणुकीनंतर लगेचच त्यांनी प्रश्न उपस्थित करायला हवा होता.”
दरम्यान, मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका करत विचारलं,
“राज्य आणि केंद्र सरकार जनरेशन-झेडच्या मुलांपासून का घाबरतंय?” तसेच त्यांनी दोन महत्त्वाच्या घोषणाही केल्या, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील या “पप्पू” वादामुळे राज्यातील राजकारणात नवा तिखट संघर्ष पेटला असून दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे.
तुकाराम मुंढेंची बदली करण्यासाठी 250 कोटी जमा, आव्हाडांच्या आरोपाने खळबळ
"Nagpur Gave Me Unforgettable Love ❤️ | Dr. Ravinder Singal"
नागपुर में लिफ्ट मांगकर युवक का अपहरण #nagpurnews #crime #kidnapping #latestnews #maharashtranews
मजदूर की मौत पर सड़क पर प्रदर्शन.. #nagpurnews #andolan #newsupdate #maharashtranews
पानीपुरी विक्रेता पर चाकू से जानलेवा हमला #nagpurnews #Crime #murder #criminal #LatestNews
मोरभवन बस स्टॉप पर चाकू लेकर हंगामा कर रहा आरोपी गिरफ्तार #nagpurnews...









