Published On : Wed, Sep 15th, 2021

Video: ठाकरे सरकार मुर्दाबादच्या नाऱ्यांत गल्लीबोळांत संघर्ष करण्याचा इशारा.

Advertisement

नागपुर: ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) आज महाराष्ट्राच्या सर्व तालुक्यांत १००० ठिकाणी एकाच वेळी आंदोलन करण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ५२ टक्के ओबीसी जनतेवर अन्याय झालेला आहे. आज पोलिस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जोपर्यंत आरक्षण पूर्ववत होणार नाही, तोपर्यंत भाजपचे (BJP) आंदोलन सुरू राहणार आहे. आता यापुढे गल्लीबोळांत संघर्ष सुरू होणार असल्याचे, ओबीसी नेते, भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले.