
नागपूर : शहराजवळच्या काटोल तालुक्यात शुक्रवारी रात्री उशीरा झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ताराबोडी परिसरात हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात कारचा चेंदामेंदा झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्व सहा जण हे नागपूरच्या काटोल तालुक्यातील रहिवासी होते.
अजय दशरथ चिखले (वय ४५) ,विठ्ठल दिगंबर थोटे (वय ४५), सुधाकर रामचंद्र मानकर (वय ४२), रमेश ओंकार हेलोंडे (वय ४८), मयूर मोरेश्वर इंगळे (वय २६), वैभव साहेबराव चिखले (वय ३२) अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. तर जगदीश दत्तुजी ढोणे (वय ४०) हा कोमात आहे.
माहितीनुसार सातही जण लग्नासाठी नागपुरात आले होते. रात्री उशिरा नागपुरात लग्नसोहळा आटोपल्यानंतर नागपूरहून काटोलच्या दिशेने आपल्या घरी जात होते. क्वालिस कार नागपूरहून काटोलच्या दिशेने जात असताना एका ट्रकने कारला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला. नागपुरात लग्नसमारंभ आटोपून हे सर्वजण काटोलच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झाला. तर जखमींना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
रेशीमबाग परिसर के एक भोजनालय में हुई चोरी... #nagpurnews #crime #newsupdate #accusedarrested...
जीजा की गंदी नज़र ने तोड़ा रिश्तों का भरोसा... #nagpurnews #crime #newsupdate...
नागपुर में गिटार टीचर पर पोक्सो का केस #nagpurnews #crime #newsupdate #accusedarrested...
शादी में गया परिवार, पीछे से घर साफ ! #nagpurnews #crime #newsupdate...
₹3.56 करोड़ से ₹125 करोड़! मुआवज़ा घोटाले का बड़ा दावा #newsupdate #news...








