Published On : Sat, Jul 27th, 2019

आगामी निवडणुका बॅलेट पेपर पद्धतीने घेण्यासाठी सर्वदलीय पक्षाचे तहसीलदारला सामूहिक निवेदन सादर

Advertisement

कामठी :-ईव्हीएम पद्धतीने घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल हा लोकशाहीचा खून करणारा आहे त्यामध्ये निवडणुकीत जिंकून येणारा अपेक्षित उमेदवाराला सुद्धा पराभव स्वीकारावा लागतो तेव्हा लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आगामी जिल्हा परिषद, तसेच विधानसभा निवडणुका ह्या बॅलेट पेपर पद्धतीने घेण्यात याव्या या मागणीसाठी मुख्य निवडणूक आयोगाला तहसीलदार मार्फत सर्वदलीय पक्षाचे सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.

याप्रसंगी नगर कांग्रेस अध्यक्ष कृष्ण यादव ,नागपुर जिला महासचिव आबिद भाई ताजी, भारिप बहुजन संघ अध्यक्ष प्रमोद दादा काबळे ,समाजवादी पार्टी महिला प्रदेश अध्यक्ष माया ताई चौरे, कामठी तालुका अध्यक्ष नाना कंभाले, माजी अध्यक्ष नगर परिषद अंकुश बवनकुले, राजकुमार जी गेडाम, बसपा चे विकास रंगारी मनोज रंगारी , माजी नगर अध्यक्ष प्रमोद मानवट कर, मौदा विधानसभा युवा कांग्रेस अध्यक्ष फैसल भाई , आरपीआय अध्यक्ष सुधीर शंभरकर, प्रमोद खोबरागड़े, लक्ष्मण संगेवार, सुरैया बानो, मंजू मेश्राम ,वसंतराव गाडगे ,विशाल मिश्राम, विशाल वाघमारे ,विष्णु चनोले, अनीता खोबरागड़े ,कल्पना सूर्यवंशी ,शंकरराव वाडीभस्मे ,राजकुमार भगत, जेटली, सुमेध रंगारी, सैयद सलीम ,अब्दुल सलाम अंसारी, राजेश काकडे ,राजेश ढोके, राकेश वानखेडे तसेच आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तागण मोठ्या संख्येत उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी