मुंबई: राज्य सरकारकडून घरोघरी ‘स्मार्ट मीटर’लावण्यात येणार अशी योजना आखण्यात आली होती. मात्र आता हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.याविरोधात वाढत चाललेला असंतोष पाहता राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत शुक्रवारी भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत याबाबत चर्चा केली व सामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही असे स्पष्ट केले असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना दिली.
आता घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी लावले जातील. अदानी पॉवर, जीनस कंपनी, एनसीसी कंपनी, मॉन्टेकालों या चार कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आले होते. साधारण हप्ताभरात हे नवीन मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरु होणार होती. परंतु आता फडणवीस यांनीच सामान्य वीज ग्राहकांकरीता स्मार्ट मीटर आणली जाणार नाहीत असे स्पष्ट केल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
स्मार्ट मीटर के खिलाफ प्रहार का आंदोलन #maharashtranews #smartmeter #andolan #electricitybill
1.53 करोड़ की शिवशाही बस बरामद #maharashtranews #crime #latestnews #accusedarrested #shivshahi #bus
Sehat ki baat - Nitin Shinde Episode - 7
ASTROLOGY/WEEKLY RASHIFAL - Abhishek Soni EPISODE - 8
नागपुर में रिश्वतखोर हेड कांस्टेबल एसीसी के जाल में... #nagpurnews #crime #anticurreption...
जाति प्रमाणपत्र रद्द, राजनीति में मचा भूचाल #maharashtranews #politicsnews #jatipramanpatra #news








