वर्षभरात साडेसहा लक्ष नागरिकांची भूक भागवली
नागपूर : नागपूर शहरातील पूर्वीच्या 10 व आठवडाभरापूर्वी सुरू झालेल्या एकूण पाच अशा 15 शिवभोजन केंद्रावरून लॉकडाऊनच्या काळात निराश्रित, निराधार नागरिकांना मोफत शिवथाळीचे वितरण सुरू आहे. वर्षभरात साडेसहा लक्ष थाळींचे वितरण झाले असून दररोज दीड हजार लोकांना याचा लाभ मिळत आहे.
‘ब्रेक द चैन ‘ या मोहिमे अंतर्गत कोरोना प्रतिबंधासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. ‘कडक निर्बंध’ लागल्याने घराबाहेर पडणे बंद झाले. नागपूर सारख्या कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या जिल्ह्यासाठी हे अत्यावश्यक होते. मात्र ज्यांच्याकडे स्वयंपाक घरच नाही, स्वतःचे घरच नाही, कुठेतरी निवारा शोधून आयुष्य काढणे अशीच ज्या निराश्रितांची परिस्थिती आहे. ज्यांच्यासाठी कुणाच्यातरी मेहरबानीने रोजचे अन्न मिळते. शिळेपाके मागून ज्यांना जगावे लागते. बस स्टँड, रेल्वे स्टेशन, मंदिर, मशिद व अन्य धार्मिक ठिकाणाच्या परिसरात घरून लोकांनी आणलेल्या अन्नाच्या, हॉटेलमधील उरलेल्या अन्नाच्या बळावर ज्यांचे जगणे सुरू आहे, अशा सर्व निराक्षित, रोजच्या जेवणाची भ्रांत निर्माण झालेल्यांना या काळात उपासमारीची वेळ आली.


नागपूर शहरात जानेवारी 2020 ते मार्च 2021 या काळामध्ये कार्यरत एकूण दहा केंद्रांच्या माध्यमातून 6 लक्ष 48 हजार थाळीचे वितरण करण्यात आले. दररोज दीड हजार लोकांना या केंद्रावरून जेवण दिले जाते. एका केंद्रावरून दीडशे थाली वितरित होते. नागपुरात गेल्या आठवड्याभरापूर्वी पूर्वीच्या 10 केंद्रात आणखी 5 केंद्राची भर पडली आहे. 15 केंद्र सध्या सुरू आहे. आता हे सर्व केंद्र निराश्रितांसाठी संजीवन केंद्र बनले आहे.
रामरक्षा आंदोलन पर विजय वडेट्टीवार का बड़ा बयान #Congress #RamRakshaAndolan #RSS #VHP...
वर्धा: 12 की बच्ची से रेप, पत्थर से हत्या #Wardha #RapeCase #MinorGirlMurderi...
शराब पार्टी के बाद 6.60 लाख पर हाथ साफ! #NagpurNews #Crime #Fraud...
फर्जी पेमेंट स्क्रीनशॉट से सायाजी होटल में ठगी... #NagpurNews #FakePayment #HotelFraud #crimenews
नागपुर के कलमना और नंदनवन इलाके में दुष्कर्म की घटनाएं #NagpurNews #CrimeNews...
उर्स की भीड़ में कार पर वार! #NagpurNews #CrimeNews #Theft #CarTheft #BagLifting...






