Published On : Thu, Dec 11th, 2025
By Nagpur Today Nagpur News

महसूल मंत्री बावनकुळेंची ‘नंबर वन’कडे झेप? जयंत पाटीलांच्या कौतुकाने राजकीय भुवया उंचावल्या!

Advertisement

मुंबई : राज्यातील महसूल खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कामकाज गेल्या काही महिन्यांत विशेषत्वाने चर्चेत आहे. क्लिष्ट, वेळखाऊ आणि लोकांना त्रास देणाऱ्या प्रक्रिया झपाट्याने सोप्या करून, अनेक प्रलंबित निर्णयांना गती देऊन त्यांनी विभागात नवा वेग आणल्याचे मानले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केलेल्या वक्तव्याने राजकीय तापमान वाढवले.

महसूल विभागाचे काम ‘डोकेदुखीचे’ असल्याचे स्पष्ट करत पाटील म्हणाले की, “दरवर्षे लोक कोर्ट-कचेऱ्यांत रेंगाळतात पण निकाल येत नाहीत. मात्र बावनकुळे मंत्री झाल्यापासून निर्णय झपाट्याने होत आहेत. त्यांनी अनेक गुंतागुंतीचे नियम मोडीत काढले. खरोखरच त्यांच्या कामाचे कौतुक करावे तितके कमी आहे.”

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यांनी पुढे मंत्र्यांकडे पाहत गौरवोद्गार काढले—
तुमच्यासमोर दोनच खुर्च्या आहेत हा विषय गौण आहे. तुम्ही निर्धास्तपणे पहिल्या क्रमांकाच्या खुर्चीकडे वाटचाल करा. तुमच्या कामाची नोंद वरिष्ठ पातळीवर व्हायलाच हवी.

या वक्तव्यामुळे सभागृहात काही क्षण कुजबूज सुरु झाली. पाटील यांच्या या विधानाने ‘बावनकुळेंच्या राजकीय उंचीला आणखी चालना मिळाली’ असे मानले जात आहे.

Advertisement

विधेयकाला सर्वपक्षीय दाद-
आज सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी सभागृहात मांडले. आश्चर्य म्हणजे विरोधकांसह सर्वच पक्षांनी या विधेयकाचे स्वागत केले.

विधेयकाचे प्रमुख मुद्दे —

शहरातील नागरिकांवर असणारा अकृषक कराचा अतिरिक्त भार संपुष्टात येणार
इमारत किंवा लेआऊट पडल्यावर एकदाच अकृषक कर; दरवर्षी भरण्याची सक्ती नाही
जमीन मोजणी प्रक्रिया सुलभ करण्याचे आश्वासन
१५ दिवसांत मोजणी पूर्ण करण्यासाठी यंत्रणा उभारण्याची घोषणा
बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, “जमिनीची मोजणी महिनोनमहिने लांबणाऱ्या अडचणी आता संपतील. नागरिकांना त्रास होणार नाही, नियम स्पष्ट आणि सोपे असतील.”

राजकीय वजन वाढले?
जयंत पाटील यांनी केलेल्या मनमोकळ्या गौरवाने बावनकुळे यांची प्रतिमा केवळ सभागृहातच नव्हे तर पक्षांतर्गतही अधिक दृढ झाल्याचे जाणकारांचे मत आहे.
पाटील म्हणाले, “लोकांची भाषा, लोकांची गरज समजून निर्णय घेणारा मंत्री म्हणजे ‘उदार राजा’. अशा राजाला वरच्या खुर्चीकडे जाण्यापासून कोण रोखणार?त्यांच्या या विधानाने भाजपच्या गोटात आणि विरोधकांतही नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.