Published On : Thu, Oct 10th, 2024
By Nagpur Today Nagpur News

भाजपकडून सत्ता टिकण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण सुरू; नाना पटोलेंचे टीकास्त्र

Advertisement

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडात भाजपने सत्ता टिकण्यासाठी पक्ष फोडाफोडीचं राजकारण सुरू केले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

भाजपला सत्ता गमावण्याची भीती वाटते आणि म्हणूनच त्यांनी विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न चालवले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांसारख्या पक्षांमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांची पार्श्वभूमी मोदी सरकारच्या असुरक्षिततेची स्पष्ट साक्ष आहे, असे पटोले म्हणाले.

Gold Rate
06 June 2025
Gold 24 KT 98,000/-
Gold 22 KT 91,100/-
Silver/Kg 1,06,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मोदींना आपली सत्ता टिकवण्याची खात्री राहिलेली नाही. त्यामुळे त्यांनी शत्रूला हरवण्याऐवजी त्यांना कमकुवत करण्यासाठी नेतृत्व आणि पक्षांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण सुरू केले आहे. याला राजकारण न म्हणता पटोले यांनी “सत्ताकारण” असे संबोधले आहे.

भाजपच्या या खेळीमागील मुख्य हेतू सत्ता कायम ठेवणे हा आहे. परंतु यासाठी त्यांनी राजकीय शिष्टाचाराचा मार्ग सोडून पक्षभेद निर्माण करण्याचा मार्ग अवलंबला आहे. भाजपच्या या फोडाफोडीच्या धोरणामुळे अनेक विरोधी पक्षांमध्ये गटबाजी आणि अंतर्गत मतभेद निर्माण झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या अनेक नेत्यांनी भाजपकडे वळण्याची घटना ही याच फोडाफोडीचं उदाहरण असल्याचा घणाघात पटोले यांनी केला.

Advertisement
Advertisement
Advertisement