गोंदिया :लोकसभा निवडणुकीत जनतेने सत्ताधारी महायुतीला धडा शिकविला. या सरकारने ज्या प्रकारे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले, तरुण, बेरोजगारांचा ज्या प्रकारे छळ केला, गरिबांच्या हातातील काम हिसकावून घेतले, ज्याप्रकारे संपूर्ण महाराष्ट्राची वाताहात सुरू आहे, त्यावर लक्ष केंद्रित करावे आणि या भ्रष्टाचारी, जनविरोधी, असंवैधानिक महायुती सरकारला राज्यातून हाकलून लावणे, हेच आमचे ध्येय आहे,
असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी मध्यरात्री गोंदिया जिल्हा दौऱ्यावर असताना भाजपचे ज्येष्ठ सदस्य आणि माजी आमदार रमेश कुथे यांच्या भेटीला आले होते.यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
राज्यातील भाजप प्रणित महायुती सरकार ही महाराष्ट्र विरोधी आहे आणि म्हणून या महाराष्ट्र विरोधी सरकारला सत्तेतून बाहेर काढणे आणि पुढे त्याकरिता धोरण आखून त्याची लोकसभेप्रमाणेच विधानसभेत ही अंमलबजावणी करणे हे आमचे प्राथमिक लक्ष आहे, असेही पटोले म्हणाले.
नागपुर में MD ड्रग्स पर पुलिस का बड़ा एक्शन #nagpurnews #md #drugs...
होटल हेरिटेज में हाई-प्रोफाइल पार्टी पर छापा #nagpurnews #crime #hukka #newsupdate #avaidh
वाठोडा में पुलिस बनकर ठगी ! #nagpurnews #crime #police #latestnews #fraud
स्मार्ट मीटर के खिलाफ प्रहार का आंदोलन #maharashtranews #smartmeter #andolan #electricitybill
1.53 करोड़ की शिवशाही बस बरामद #maharashtranews #crime #latestnews #accusedarrested #shivshahi #bus
Sehat ki baat - Nitin Shinde Episode - 7









