Published On : Fri, May 12th, 2023
By Nagpur Today Nagpur News

बिहारी -हिंदी भाषिकांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य ; राज ठाकरेंचा दिल्ली कोर्टात माफीनामा !

Advertisement

जमशेदपुर: उत्तर भारतीय, बिहारी आणि हिंदी भाषिक लोकांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करून द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या अखेर माफी मागावी लागली आहे.

राज यांनी दिल्ली उच्च न्यायालयात माफी मागितली आहे. यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जसमीत सिंग यांच्या न्यायालयाने वरील प्रकरणात माफीनामा स्वीकारून हा खटला संपवत असल्याचे जाहीर केले.

Gold Rate
17 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,42,600/-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,83,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जमशेदपूर दिवाणी न्यायालयाचे वकील सुधीर कुमार पप्पू यांनी ११ मार्च २००७ रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध सोनारी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. परंतु, जिल्हा पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने 13 मार्च 2007 रोजी माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी जमशेदपूर यांच्या न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली.

महत्त्वाचे म्हणजे विशेष सुनावणीसाठी न्यायालयाने हे प्रकरण डीसी अवस्थी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात वर्ग केले. जिथे तक्रारदार सुधीर कुमार पप्पू, साक्षीदार ग्यानचंद यांची चाचणी आणि वर्तमानपत्रातील क्लिपिंग्ज न्यायालयासमोर ठेवण्यात आल्या होत्या. ज्यावर 11 एप्रिल 2007 रोजी न्यायालयाने दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात समन्स जारी केले होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement