Published On : Fri, Jun 28th, 2024
By Nagpur Today Nagpur News

व्हिडीओ; ‘जलपर्णी’च्या विळख्याने अंबाझरी तलावाचे अस्तित्व धोक्यात,जलकुंभ साफ केल्याचा मनपाचा दावा खोटा

Advertisement

नागपूर : राज्याची उपराजधानी असेलल्या नागपुरात पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाझरी तलावाचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे. जलपर्णी म्हणजे इकाॅर्निया या वनस्पतीने तलावाला विळखा घातल्याने तलाव अक्षरश: नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

नागपूर महानगर पालिकेने ‘जलपर्णी’ग्रसित जलकुंभ साफ केल्याचा दावा केला होता. मात्र हा दावा खोटा असून ‘नागपूर टुडे’ने यावर प्रकाश टाकला. तसेच यासंदर्भात पर्यावरण अभ्यासकांशीही चर्चा केली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जलपर्णीची तलावात होते झपाट्याने वाढ –
जलपर्णी वनस्पतीची तलावात झपाट्याने वाढ होते. एका वर्षात एक वनस्पती तीन हजारांहून अधिक बियांची निर्मिती करू शकते. त्या बियांचे आयुष्य वीस वर्षांपर्यंत असते.

ती पाण्यावर तरंगणारी असल्याने तिचा प्रसार झपाट्याने होतो आणि नियंत्रण करणे कठीण जाते. पसरट पानांमुळे ही वनस्पती वातावरणातील ऑक्सिजन तलावाच्या तळापर्यंत पाेहचू देत नाही. जलपर्णीच्या अनियंत्रित वाढीमुळे माशांना पुरेसे ऑक्सिजन मिळणे थांबते आणि मासे मरायला लागतात.इतके नाही तर तलावातील इतर सजीव, वनस्पती व जैवविविधता नष्ट हाेते.

Advertisement

ऑक्सिजन घटल्याने पाण्याचा गढूळपणा वाढताे आणि पाणी प्रदूषित होते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागपुर महानगर पालिकेने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.