
नागपूर : शहरात झालेल्या अचानक अवकाळी पावसाने शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. विशेषतः कळमना बाजारात खुलेआम ठेवण्यात आलेले हजारो क्विंटल धान्य पावसात भिजल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दूरवरच्या भागांतून शेतकरी आपले धान्य विक्रीसाठी कळमना बाजारात घेऊन आले होते. मात्र, अचानक कोसळलेल्या पावसामुळे धान्य सुरक्षित राहू शकले नाही. बाजारात पुरेशा शेडची आणि साठवणुकीची सोय नसल्याने मोठ्या प्रमाणात धान्य उघड्यावरच ठेवण्यात आले होते.
परिणामी, पावसाच्या पाण्यात धान्य पूर्णपणे भिजले.
या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत सापडले असून, आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक ताण सहन करत असताना या अवकाळी पावसाने त्यांची परिस्थिती आणखी बिकट केली आहे.
दरम्यान, नागपुरात झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...




