पुणे :: मध्य रेल्वेच्या अंतर्गत आठ वंदे भारत रेल्वेगाड्या धावत आहेत. त्यातील नागपूर-बिलासपूर वंदे भारत रेल्वेगाडीला प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत असून, या गाडीतून महिन्याला 100 टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. या गाडीचा इतर गाड्यांच्या तुलनेत प्रवासी संख्येत प्रथम क्रमांक लागतो, तर द्वितीय क्रमांक सोलापूर वंदे भारत गाडीचा लागत आहे.
नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये केंद्र शासनाने देशभरात 400 वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी निधीची तरतूद केली आहे. त्यानुसार रेल्वेच्या विविध विभागात वंदे भारत गाड्या धावण्यास सुरुवात झाली आहे. त्या गाड्यांचे जल्लोषात उद्घाटन झाल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. मध्य रेल्वेअंतर्गत सुरू असलेल्या या आठ गाड्यांची प्रवासी संख्या 50 ते 80 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
महिला को एमडी ड्रग्स के झूठे केस में फंसाने की साजिश नाकाम...
एमआईडीसी में युवक की बेरहमी से हत्या #nagpurnews #crime #murdernews #newsupdate
सिर्फ एक धक्का... फिर चला चाकू #nagpurnews #crime #accusedarrested #murdernews
सेंट्रल बिल्डिंग पर महिलाओं का अनोखा प्रदर्शन #MaharashtraNews #NewsUpdate #LatestNews #Andolan
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY








