Published On : Sat, Sep 23rd, 2017

राज ठाकरेंची Facebook पोस्ट, बाबासाहेबांचे स्मारक बांधून दलित मते खेचण्याचा प्रयत्न

Raj Thackeray

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून फटकेबाजी करण्‍यास सुरुवात केली आहे. राज यांनी ‘स्मारकं कशासाठी…’ या शीर्षकावरून सरकारवर बोचरी टीका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बांधून केवळ दलित मते आपल्याकडे खेचण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे राज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आगामी निवडणुका समोर ठेऊन मुंबईतील इंदू मिलची जागा डॉ.आंबेडकरांच्या स्मारकासाठी देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे स्मारक हे त्यांचे गडकिल्ले आहेत. त्यांचे संवर्धन करणे आणि त्यातून आत्ताच्या आणि येणाऱ्या पिढयांना स्फूर्ती मिळणे, हा त्या स्मारकामागचा उद्देश असावा, असेही राज यांनी म्हटले आहे. महापुरूषांच्या व्यक्तीमत्वाप्रमाणेच त्या स्मारकाचे स्थापत्यशास्त्र असावे, असे मतेही या पोस्टमध्ये त्यांनी दिले आहे.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement