Published On : Sat, Jan 4th, 2025
By Nagpur Today Nagpur News

खापरखेडा गोळीबार प्रकरणः गुन्ह्यातील चार आरोपींना अटक, मुख्य आरोपी अद्याप फरार

Advertisement

नागपूर : नागपूर जिल्ह्यात नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी टोळीयुद्धातून एका कुख्यात गुन्हेगाराची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. शेकू गँग आणि हिरणवर गँगमधील जुन्या वैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती आहे. या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. यासोबतच या हत्येचा मुख्य सूत्रधार शेकू खान हाही पोलिसांच्या ताब्यात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिरणवर टोळीचे सदस्य गुरुवारी दुपारी त्यांच्या कारमधून जात होते, त्यादरम्यान खापरखेडाजवळ शेकू टोळीच्या सदस्यांनी त्यांचा पाठलाग करून कारवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात पवन हिरणवार याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ बंटी हिरणवार व अन्य एक साथीदार गंभीर जखमी झाले.एकदमी फिल्मी स्टाईल हा हल्ला करण्यात आला. या गोळीबारानंतर शेकू टोळीतील सदस्य पळून गेले.

Gold Rate
Friday 17 Jan. 2025
Gold 24 KT 79,500 /-
Gold 22 KT 73,900 /-
Silver / Kg 91,400 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेकू टोळी आणि पवन हिरणवार टोळीमध्ये अनेक वर्षांपासून वैर सुरू आहे. हिरणवार टोळीने काही काळापूर्वी शेकूच्या लहान भावाची हत्या केली होती. या सूडाच्या भावनेतूनच शेकूला हिरणवर बंधूंना संपवायचे होते. पवन हिरणवार व बंटी हिरणवार हे त्यांच्या तीन साथीदारांसह बाभूळखेडा येथील पंचमुखी हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, शेकूला त्यांचे ठिकाण कळले आणि त्यांनी साथीदारांसह त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. खापरखेडा पोलीस ठाण्यांतर्गत गोंडखैरी रोडवर शेकू टोळीने पवनच्या गाडीवर हल्ला केला.

गोळीबारादरम्यान दोन दुचाकीस्वारांनी आपली दुचाकी कारच्या मध्यभागी ठेवून पवन हिरणवार यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात पाठीत गोळी लागल्याने पवनचा जागीच मृत्यू झाला. गोळी लागल्याने बंटीही गंभीर जखमी झाला. कारमधील इतर दोन तरुणांनी शेकू टोळीला प्रत्युत्तर दिले, त्यामुळे शेकू टोळीला पळून जावे लागले. या घटनेत शेकूचे पिस्तूलही घटनास्थळी पडली. ती पोलिसांनी जप्त केले. खापरखेडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सिद्धार्थ कोवे, बाबू शाक्य, अधिराज कनोजिया आणि ललित भुसारी यांचा समावेश आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार हिरणवर टोळीतील एका सदस्याने शेकूला पवन आणि बंटीची माहिती दिली होती. याच आधारे शेकूने हिरणवार बंधूंवर हल्ला केला. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकण्याची भीती आहे.

Advertisement