Published On : Thu, Jun 12th, 2025
By Nagpur Today Nagpur News

भाजप कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक कामामुळेच जनतेशी नातं जुळलं आहे! — राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

आ. जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयात नागरी सेवा केंद्राचे उद्घाटन
Advertisement

नागपूर : भाजप कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रामाणिक सेवेमुळेच आज जनता पक्षाशी जोडली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजना आता थेट जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी अशा सेवा केंद्रांची गरज होती. नागपूरमध्ये सुरू झालेल्या नागरी सेवा केंद्रामुळे इतर भागांनाही प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज येथे केले.

आमदार संदीप दिवाकरराव जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयात ‘शासकीय योजना व नागरी सेवा केंद्र’ या उपक्रमाचे उद्घाटन डॉ. भोयर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी होते. आमदार संदीप जोशी, माजी नगरसेवक संदीप गवई, प्रा. दिलीप दिवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Gold Rate
13 June 2025
Gold 24 KT 99,400 /-
Gold 22 KT 92,400 /-
Silver/Kg 1,07,100/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पुढे बोलताना डॉ. पंकज भोयर म्हणाले, भाजपची व्होट बँक केवळ राजकारणावर नाही, तर कार्यकर्त्यांच्या सेवाभावी वृत्तीवर उभी आहे. कार्यकर्त्यांच्या या पाठबळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात आज भारताची दखल संपूर्ण जग घेत आहे. स्थानिक पातळीवरही नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अशा सेवा केंद्रांची भूमिका अत्यंत मोलाची ठरणार आहे. या सेवा केंद्रापासून मलादेखील ऊर्जा मिळाली असून आपल्या मतदारसंघातही असे केंद्र सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला याच कार्याच्या बळावर शत-प्रतिशत यश मिळेल, असा विश्वासही डॉ. भोयर यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात आमदार संदीप जोशी यांनी नागरी सेवा केंद्राच्या उद्देशाची माहिती दिली. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सहज व सुलभ पद्धतीने मिळावा यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे केंद्र दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत कार्यरत राहील. कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता फक्त शासकीय शुल्कावरच सेवा दिली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षस्थावरून बोलताना दयाशंकर तिवारी म्हणाले, संदीप जोशी यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केल्यानंतर मी दिलेली सूचना तातडीने मान्य करून अवघ्या १० दिवसांत नागरी सेवा केंद्र सुरू केले. नागरिकांपर्यंत या सेवेची माहिती पोहोचवण्याचे कार्य सर्व कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

कार्यक्रमाला भाजप दक्षिण पश्चिमचे माझी अध्यक्ष रितेश गावंडे, पश्चिम नागपूरचे माझी अध्यक्ष विनोद कन्हेरे, मंडळ अध्यक्ष सर्वश्री महेंद्र भुगावकर, विनोद शिंदे, ईश्वर ढेंगरे,विनय दाणी, विनोद बघेल, अमर खोडे, माजी नगरसेवक प्रमोद तभाने, सोनाली कडू यांच्यासह भाजप दक्षिण पश्चिम नागपूर आणि पश्चिम नागपूरचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement