Published On : Wed, Nov 12th, 2025
By Nagpur Today Nagpur News

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; केदार गटाला धक्कादेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुलाखती केल्या रद्द !

-13 नोव्हेंबरला नव्याने साक्षात्कार
Advertisement

नागपूर : स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार निवड प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. 7 नोव्हेंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीकडून घेण्यात आलेल्या मुलाखतींना राज्य काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अवैध घोषित करत त्या रद्द केल्या आहेत. या निर्णयामुळे सुनील केदार यांच्या गटाला मोठा धक्का बसला असून जिल्हा काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला आहे.

त्या दिवशी जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत सुनील केदार, राजेंद्र मूलक, सुरेश भोपर यांसारखे वरिष्ठ नेते उपस्थित होते. इच्छुक उमेदवारांचे साक्षात्कार घेऊन प्रत्येकी तीन उमेदवारांच्या पॅनलची यादी तयार करून ती प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आली होती. परंतु ही प्रक्रिया राज्य निरीक्षक आणि आघाडीच्या अधिकृत प्रतिनिधींच्या अनुपस्थितीत पार पडल्याने नियमबाह्य असल्याचे प्रदेश काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

Gold Rate
12 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,23,500 /-
Gold 22 KT ₹ 1,14,900 /-
Silver/Kg ₹ 1,55,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रदेशाध्यक्षांचा नवा आदेश-
प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी जिल्हा काँग्रेसला पत्र पाठवत मागील सर्व मुलाखती रद्द करण्याचे आणि नव्या वेळापत्रकानुसार प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या निर्देशानुसार 12 नोव्हेंबरला राज्य निवड समितीची बैठक आणि 13 नोव्हेंबरला दुपारी 12.30 वाजता नव्याने उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

या बैठकीसाठी प्रभारी निरीक्षक व विधानसभा निरीक्षकांची उपस्थिती बंधनकारक ठेवण्यात आली आहे. जिल्हा काँग्रेसला सर्व इच्छुकांना पुन्हा बोलवून मुलाखतीची नवी प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह-
या प्रकरणानंतर जिल्हा काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गटबाजी तीव्र झाली आहे. केदार गटाने स्वतःच्या प्रभावाखाली मुलाखती घेतल्याचा आरोप दुसऱ्या गटाकडून करण्यात आला असून, त्याबाबत प्रदेश काँग्रेसकडे औपचारिक तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

प्रदेश काँग्रेसने ही तक्रार गांभीर्याने घेत जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांना कडक शब्दांत फटकारले आहे. तसेच सर्व आगामी प्रक्रिया राज्य पातळीवरील देखरेखीखालीच पार पाडण्याचे आदेश दिले आहेत.प्रदेशाध्यक्षांच्या या हस्तक्षेपानंतर जिल्ह्यातील काँग्रेसची अंतर्गत समीकरणे बदलण्याची शक्यता असून, केदार गटाचे वर्चस्व कमी होण्याचे संकेत दिसत आहेत.

Advertisement
Advertisement