
नवी दिल्ली : आज २ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करत आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्यासह अनेक नेत्यांनी राजघाटावर पोहोचून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.
गांधी जयंतीच्या खास दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले की,मी महात्मा गांधींना अभिवादन करतो. त्यांच्या काळातीत शिकवणीमुळे आमचा मार्गातील अंधार दूर झाला.
महात्मा गांधींचा प्रभाव जागतिक पातळीवर आहे, जो सर्व मानवजातीला एकता आणि करुणेच्या भावना पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळते. एकता आणि सुसंवाद वाढण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू या. त्यांचे विचार प्रत्येक तरुणातील बदलासाठी सक्षम आहेत,असे मोदी ट्विटमध्ये म्हणाले.
दरम्यान देशभरात आज गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यानिमित्ताने ठिकठिकाणी आज स्वच्छता अभियानही राबवले जात आहे. सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबून कोणत्याही हिंसाचाराला पाठबळ दिले नाही.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
नाबालिग छात्रा से किया दुष्कर्म .. #nagpurnews #crime #newsupdate
कार का शीशा तोड़ 5 लाख चोरी; दिनदहाड़े बॅगलिफ्टिंग.. #nagpurnews #latestnews #crime
GANGA-JAMUNA इलाके में युवक से चाकू की नोक पर 25 हजार की...
मोमिनपुरा में पुराने विवाद पर युवक पर जानलेवा हमला.. #nagpurnews #Crime #LatestNews
शादी नहीं होने के तनाव में युवक ने दी जान.. #nagpurnews #LatestNews...







