
नागपूर– दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवर उपस्थित राहतात. दोन ते तीन दिवसांचे मुक्काम असलेल्या या अनुयायांसाठी पाणी आणि शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांची आवश्यकता असते. यासाठी आयटीआय समोरील मोकळ्या जागेत प्रशासनाकडून तात्पुरती शौचालये उभारली जात होती.
मात्र यंदा या जागेला पक्की भिंत बांधून बंदिस्त करण्यात आल्याने, शौचालयाची जागा वापरात येणार नसल्याने अनुयायांपुढे मोठी गैरसोयीची समस्या उभी राहिली आहे. या पवित्र जागेवर वर्षातून केवळ एकदाच ही सुविधा वापरली जाते, तरीही जागा बंद केल्यामागे प्रशासनाचा हेतू काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
ही केवळ सुविधा हटवण्याची बाब नसून, ही अनुयायांच्या सन्मानाची बाब आहे,असे भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष प्रकाश बन्सोड यांनी सांगितले.
त्यांनी प्रशासनाला दोन ठाम मागण्या केल्या आहेत:
पूर्वीप्रमाणेच तात्पुरती शौचालये उभारावीत किंवा तत्सम पर्यायी व्यवस्था त्वरित उपलब्ध करावी
दरम्यान अन्यथा हजारो अनुयायांच्या असुविधेला प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही पँथर संघटनेकडून देण्यात आला आहे.
अमरावती डबल मर्डर केस में बड़ा खुलासा! #AmravatiNews #MaharashtraNews #DoubleMurder #CrimeNews
वर्धा में राष्ट्रवादी युवक कांग्रेस का धरना #MaharashtraNews #NCP #SonamWangchuk #NEET #PaperLeak
अमरावती में छात्रों का जोरदार प्रदर्शन #vidarbhanews #amravati #updatenews #maharashtranews
रील्स के चक्कर में मलंगगढ़ पर फंसे युवक #maharashtranews #ambarnath #updatenews #maharashtra
निरुपम का शिंदे नेतृत्व पर बड़ा दावा #NagpurNews #ShivSena #ubt #political #LatestNews...
भारी बारिश में छात्रों का वांगचुक समर्थन प्रदर्शन #maharashtranews #bhiwandi #updatednews #news




