Published On : Mon, Jul 8th, 2024
By Nagpur Today Nagpur News

मुंबईतील पहिल्याच पावसात सरकारचे पितळ उघडे पडले; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Advertisement

मुंबई : मुंबई रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकाच पावसात देशाची आर्थिक राजधानी पाण्याखाली जाते हे अत्यंत गंभीर आहे.

पावसाने शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारचे पितळ उघडे पाडले असून महाभ्रष्टयुती सरकारने, चुल्लू भर पानी में मुंबई को डुबा दिया, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुंबई महानगर पालिकेचे कारभारी स्वतः मुख्यमंत्री आहेत पण चुकीच्या व्यक्तीच्या हातात राज्याची सुत्रे असल्याने मुंबई व महाराष्ट्रातील जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागत आहे. मुंबईत झालेला पाऊस हा काही पहिल्यांदाच झालेला नाही.

यापेक्षा मोठा पाऊस मुंबईत झालेला आहे पण आजच्या सारखी बिकट परिस्थिती झाली नव्हती. राजकारणापेक्षा मुंबईच्या कामात जास्त लक्ष घातले असते तर आज मुंबईतील जनतेला या समस्येला तोंड द्यावे लागले नसते, असे पटोले म्हणाले.

Advertisement
Advertisement