‘मी पुन्हा येईन…’ असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात केला. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचं अधिवेशन असून या अधिवेशनाचं सूप वाजण्यापूर्वी विधिमंडळाला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी समर्पक अशा कवितेतून आपला निर्धार बोलून दाखवला.