
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसह मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे. विदर्भातील मॉन्सून पुन्हा सक्रीय झाला असून, निरोप घेण्यापूर्वी शेवटचा जोर त्याने दाखवू शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
नागपूरमध्ये बुधवारी सकाळी ऊन असतानाही दुपारी आकाश भरून आले आणि रामदासपेठ, धंतोलीसह शहरातील अनेक भागात पावसाने राडा माजवला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवारी यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह काही भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे.
पावसाळी परिस्थिती पुढील चार-पाच दिवस कायम राहणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना विशेष सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे, कारण सोयाबीन, तूर, कापूस, पालेभाज्या तसेच संत्रा-मोसंबी यासारख्या पिकांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. विदर्भासह मध्य भारतात बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाळी वातावरण पसरले आहे.
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...




