
मुंबई : हवामान विभागाने विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, या भागांमध्ये वादळ व विजांचा कडकडाट होण्याचा धोका असल्याचा अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मंत्रालयाने नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आणि घराबाहेर अत्यावश्यक कारणाशिवाय न पडण्याचे आवाहन केले आहे.
वाऱ्याचा वेग अचानक वाढण्याची, तसेच काही भागांत जोरदार वीज पडण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. त्यामुळे नागरिक, शेतकरी, प्रवासी आणि वाहनधारकांनी सावध राहणे आवश्यक आहे. सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि ओल्या भिंतींना व झाडांच्या खाली थांबणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
शाळा, महाविद्यालये आणि विविध कार्यालयांनी देखील कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती व सूचना देण्यास सुरुवात केली आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून, हवामानाशी संबंधित कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवली तरी तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी तयारी ठेवण्यात आली असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime #CCTV #LatestNews...
अजमेर गया परिवार, पीछे से 17 लाख की चोरी! #NagpurNews #Theft #CCTV...
बारिश में प्रहार का लोटांगन आंदोलन #vidarbhanews #अमरावती #newsupdate #vidarbha #nagpurnews
राहुल गांधी की गिरफ्तारी पर नागपुर में बवाल! #RahulGandhi #Congress #NagpurNews #StudentProtest
नीट पेपर लीक पर कांग्रेस का प्रदर्शन #vidarbhanews #वर्धा #newsupdate #vidarbha #nagpurnews
सेवानिवृत्त शिक्षकों की भर्ती प्रस्ताव खारिज #maharashtranews #नवी मुंबई #newsupdate #maharashtra




