नागपूर : विदर्भात गेल्या काही दिवसांपासून अदृश्य झालेल्या पावसाने काल रात्रीपासून दमदार हजेरी लावली आहे. काल रात्री ९ वाजल्यापासून नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसाची संततधार सुरु असून, यामुळे विदर्भातील शेतकरी सुखावला आहे.
गेल्या २० दिवसांपासून विदर्भात पावसाने दडी मारली होती. सुरुवातीला झालेल्या पावसानंतर विदर्भातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पिकांची पेरणीही उरकलेली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट ओढवलेले होते.
मात्र कालपासून सुरु झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून त्यांच्यावर असलेले दुबार पेरणीचे संकट टळले आहे. काल रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळे नागपूर शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याच दृश्य बघायला मिळत आहे. त्यातच नागपुरात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने आज सकाळपासून नागपूरकरांना काही भागात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...





