नागपूर: बहुप्रतिक्षित पतंजली फूड अँड हर्बल पार्कचे उद्घाटन ९ मार्च रोजी होणार आहे. उद्घाटनापूर्वी, पतंजली आयुर्वेदाचे एमडी आणि सीईओ आचार्य बालकृष्ण शुक्रवारी ७ फेब्रुवारीला नागपूरला पोहोचले.यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पतंजलीच्या नागपूर येथील प्लांटबद्दल संपूर्ण माहिती दिली.बालकृष्ण म्हणाले, “या प्लांटमध्ये जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची यंत्रे बसवण्यात आली आहेत. येथे केवळ संत्रीच नाही तर सर्व प्रकारच्या फळे आणि भाज्यांवर प्रक्रिया केली जाईल. यासोबतच, विदर्भातील शेतकरी आता राजा होणार तो मागणारा नाही तर देणारा होणार असल्याचे विधान बालकृष्ण यांनी केले.
थेट शेतकऱ्यांच्या शेतातून उत्पादने घेतली जातील-
आचार्य बालकृष्ण म्हणाले की, पतंजली थेट शेतकऱ्यांकडून उत्पादने खरेदी करेल. ही खरेदी ऑनलाइन आणि डिजिटल माध्यमातून करावी लागेल. यासाठी एक योग्य पोर्टल देखील तयार करण्यात आले आहे. जिथे कोणताही शेतकरी ज्याला त्याचे पीक आम्हाला विकायचे आहे तो स्वतःची नोंदणी करू शकतो आणि ते थेट आम्हाला विकू शकतो. एकीकडे, यामुळे शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळण्यास मदत होईल आणि दुसरीकडे, मध्यस्थांकडून होणारा नफाही थांबेल.
शेतकऱ्यांनी त्यांची संपूर्ण माहिती पोर्टलवर सादर केल्यानंतर, आम्ही त्यांच्या शेतातून थेट पिके उचलू. यामुळे शेतकऱ्यांचे वाहतुकीवरील पैसे वाचतील.यासोबतच, त्यांनी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात खरेदी केंद्रांसह एक चॅनेल तयार करण्याबद्दलही सांगितले.
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...





