हत्या की आत्महत्या रहस्य अजूनही कायमच
कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या (रडके)आजनी गावातील 24 वर्षोय राकेश शंकर उंबरकर नामक तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून असलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याची घटना 13 सप्टेंबर ला सकाळी 6 वाजता निदर्शनास आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करीत चर्चेचा विषय ठरला होता . आज या घटनेला एक आठवडा लोटला मात्र या प्रकरणातील हत्या की आत्महत्या चे रहस्य अजूनही कायम आहे.
प्राप्त माहितीनुसार संशसायस्पद मृतक हा मूळचा भिवापूर तालुक्यातील नक्षी गावाचा राहिवासी असून वयाच्या 5 व्या वर्षापासूनच कामठी तालुक्यातील आजनी गावातील रहिवासी मोठी आई राधाबाई रामभाऊ काकडे कडे वास्तव्यास होता . तसेच वयाधीन अवस्थेत जुनी ओली कामठी येथील ओम किराणा स्टोर्स येथे नौकर म्हणून कार्यरत होता.12सप्टेंबर गणेशोत्सव विसर्जन चा दिवस असल्याने कामावर गेला नव्हता तर दुसऱ्या दिवशी सकाळी घरमंडळी सकाळी उठल्यावर मृतक राकेश घरात दिसून न आल्याने मृतकाची मोठी आई
त्याला बघण्यासाठी घराच्या छतावर गेली असता मृतक हा छताच्या लोखंडि साखळीला एका लहानश्या पांढऱ्या रंगाच्या हातरुमालीने गळा बांधून असून गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने मृतावस्थेत दिसून आला.हे दृश्य बघून एकच धक्का बसला दरम्यान या घटनेसंदर्भात ही हत्या की आत्महत्या या चर्चेला अधिकच उधाण आले.
घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनार्थ नजीकच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलवित मृतकाच्या पार्थिवावर रीतसर पद्धतिने शवविच्छेदन करीत तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली मात्र या घटनेणदर्भात हत्या की आत्महत्या, मृत्यूचे नेमके कारण काय?याबाबत पोलिस त्या दिशेने तपास करीत आहे मात्र आठवडा लोटूनही या प्रकरणाचा उलगडा होत नसल्याने हे प्रकरण पोलिसांना आव्हानात्मक ठरत आहे.
संदीप कांबळे कामठी

