
केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आयोगाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.
याचबरोबर ठाकरे गटाने जुलै महिन्यात दाखल केलेल्या अंतरिम अर्जात, राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये शिंदे गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह वापरण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.
या अर्जावर सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी संपूर्ण प्रकरण अंतिम टप्प्यात नेण्याचे संकेत दिले होते. आधी ही सुनावणी 20 ऑगस्टला होणार होती, परंतु राष्ट्रपतींकडून राज्यपाल आणि केंद्राच्या विधेयकांवरील वेळमर्यादा संदर्भात सल्ला मागवण्यात आल्याने न्यायमूर्ती सूर्य कांत यांना त्या खंडपीठात सहभागी व्हावे लागले आणि सुनावणी पुढे ढकलली गेली.
आता मात्र आजची सुनावणी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. धनुष्यबाण कोणाच्या हाती जाणार — शिंदे की ठाकरे? यावर आज सर्वोच्च न्यायालयात मोठा निर्णय अपेक्षित आहे.
मिसिंग लिंक पर सरकार घिरी, भ्रष्टाचार के आरोप तेज ...#newsupdate #maharashtranews #maharashtra
धंतोली से एक ही परिवार के 5 सदस्य रहस्यमय तरीके से लापता...
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
दुकान के बोर्ड को लेकर विवाद #nagpurnews #viral #vivad #crime #marpeet #latestnews
Nagpur’s Emerging Markets: Opportunities, Challenges & Future Growth | Interview with Pankaj...
इंस्टाग्राम फ्रेंडशिप बनी खूनी टकराव की वजह... #nagpurnews #crime #instagram #friendship #latestnews




