Published On : Mon, Apr 1st, 2024
By Nagpur Today Nagpur News

भाजप सर्वात आधी मुंबईतून तडीपार होणार; संजय राऊतांच्या हल्लाबोल

Advertisement

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत. आता शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
आपण मुंबईत 10 सभा घ्या नाहीतर 50 सभा घ्या. पण मुंबईच्या जनतेने निश्चित केले आहे. यावेळी भाजप सर्वात आधी मुंबईतून तडीपार.

देशात तर होणारच. मात्र आपण मुंबईवर ज्या पद्धतीने अन्याय केला आहे, मुंबई लुटण्याचा प्रयत्न केला आहे, मुंबई लुटून गुजरातला घेऊन जाण्याची, मुंबईतील मध्यमवर्गियांसोत जो छळ कपट केला आहे, त्यामुळे नरेंद्र मोदी येथे येऊन काय बोलणार? अशा शब्दात मोदींनी संताप व्यक्त केला. ज्या पद्धतीने आपला धारावीसह मुंबईही अदानींना विकण्याचा कट आहे, असे आरोप करत, मुंबईकरांनी आपल्या मते का द्यावीत? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मोदींना अजूनही वाटत आहे की ते पंतप्रधान आहेत. मात्र लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपण आता पंतप्रधान नाही. जेव्हा निवडणूक जाहीर होते, तेव्हा आपण जास्तीत जास्त कार्यवाहक पंतप्रधान असतात. पण आपण त्याच पद्धतीने फिरत असाल आणि घोषणा करत असाल, लोकांना धमक्या देत असाल, तर हे चालणार नाही, असेही राऊत म्हणाले.

Advertisement