भंडारा : नाग नदीतील प्रदूषित पाण्याने वैणगंगा नदी प्रदूषित झाली आहे. या वैणगंगेचे पाणी भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पिण्यासाठी दिले जाते. या जिल्ह्यातील गावांतील पाण्याची कधीही प्रशासनाने तपासणी केली नाही.
याच धरणाचे पाणी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील शेतीला दिले जाते. एवढेच नव्हे भविष्यात राज्य सरकारकडून प्रस्तावित वैणगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून नरखेड, काटोलसारख्या गावांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नाग नदीच्या प्रदूषित पाण्यावर लक्ष वेधत आहे. परंतु आजपर्यंत तोडगा निघाला नाही. त्यातच आज पर्यावरण विभागाने चुकीची माहिती दिल्यावर संताप व्यक्त करीत आमदार डॉ. परिणय फुके यांनी प्रशासनावर जोरदार प्रहार केला.
Advertisement









