Published On : Thu, Jul 3rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

धान खरेदी योजनेत शेतकऱ्यांच्या नावावर दलालांचा फायदा ; नाना पटोलेंचा विधानसभेत आरोप

Advertisement

भंडारा : राज्यात सुरू असलेल्या धान खरेदी योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून, शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा दलालांच्या खिशात जात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी बुधवारी विधानसभेत केला.

पटोले म्हणाले, “केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्यात धान खरेदी योजना राबवली जाते. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य दर मिळावा, हा असला तरी प्रत्यक्षात या योजनेचा फायदा बिचौलिये आणि दलाल घेत आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर ही योजना राबवली जात असली तरी मुल्य दिलं जातं दलालांना!”

Gold Rate
23 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,57,800/-
Gold 22 KT ₹ 1,46,800/-
Silver/Kg ₹ 3,29,800 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ते पुढे म्हणाले, “या भ्रष्टाचारामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार येत आहे. शेतकऱ्यांना मदत होण्याऐवजी सरकारी निधीची उघडपणे लूट होत आहे. हे लूटमारचं जाळं आता अधिक खोलवर गेलेलं आहे, त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना गरजेची आहे.”

नाना पटोले यांनी यापूर्वीच्या अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर तेव्हाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन उपाय करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असंही पटोलेंनी अधोरेखित केलं.

“या प्रकरणात नेमकी कोणती पावलं उचलण्यात आली? दोषींवर काय कारवाई होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली पाहिजेत,” अशी जोरदार मागणीही नाना पटोलेंनी सभागृहात केली.

राज्य सरकारने आता या गंभीर प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, अन्यथा ही योजना शेतकऱ्यांच्या नव्हे, तर दलालांच्या फायद्याची योजना बनून राहील, अशी तीव्र टीकाही त्यांनी यावेळी केली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement