
नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेतृत्वावर पुन्हा एकदा कठोर शब्दांत टीका करत पक्षाच्या सध्याच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विशेषतः राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर त्यांनी थेट निशाणा साधला.
बावनकुळे यांच्या मते, काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून, पक्षात टिकून राहणं हेच धोकादायक ठरत असल्याची भावना बळावत आहे. याच कारणामुळे अनेक जण पक्ष सोडण्याचा मार्ग स्वीकारत असल्याचा दावा त्यांनी केला.
काँग्रेसची घसरती कळा ही नेतृत्वाच्या कमकुवतपणामुळेच आहे. राहुल गांधी यांनी या परिस्थितीकडून धडा घेतला पाहिजे, अन्यथा पक्षाची स्थिती आणखी खालावेल,” असे ते म्हणाले.
तसेच, सध्याचे नेतृत्व पक्षाला बळकट करण्याऐवजी कमजोर करत असल्याची टीकाही त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.








