
बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणाला धक्का देणारी एक भीषण घटना घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमानतळावर लँडिंग करताना विमान अपघात झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. या दुर्घटनेत अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
अजित पवार आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रचाराच्या मोहिमेत बारामती येथे आले होते. सकाळी विमानाने त्यांनी बारामती पोहोचले, मात्र विमान धावपट्टीवर उतरतानाच ते अचानक कोसळले आणि प्रचंड जळाल्याने विमान खाक झाले.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, विमानात एकूण सहा प्रवासी होते. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचा वैयक्तिक सहाय्यक, एक पी.एस.ओ., तसेच दोन पायलट आणि एक सहायक कर्मचारी यांचा समावेश होता. या अपघातात कोणीही वाचू शकले नाही.
मृतांच्या यादीत अजित पवारांसह, विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, आणि कॅप्टन शांभवी पाठक यांची नावे आहेत.
या दु:खद घटनेनंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांच्या नेत्यांनी या घटनेवर सखोल दुःख व्यक्त केले आहे. बारामतीसह महाराष्ट्राच्या विविध भागांत शोकसभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
राज्यातील या महत्त्वाच्या नेत्याच्या अकाली निधनामुळे एक मोठी राजकीय हानी झाली असून, आगामी निवडणुकीच्या प्रचारावरही या घटनेचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.








